बळीराजाचा महावितरणला शॉक; वीज उपकेंद्राला ठोकले टाळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar News :- कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील वीज उपकेंद्राला संतप्त शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. विजेच्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन कर्मचाऱ्यांना घेराव घालत उपकेंद्रासमोर ठिय्या दिला.

अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाटेवाडी, आनंदवाडी आणि निमगाव डाकु या तीन गावांसाठी महावितरणकडून शेतीपंपासाठी दिवसाआड आठ तास वीज दिली जाते.

अशातही वीज केवळ पंधरा ते वीस मिनिटे चालते. वेळोवेळी खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी संतप्त झाले.

दरम्यान वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर शेतकऱ्यांनी संघटित होऊन पाटेवाडी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना घेराव घालत टाळे ठोकले. वीज वेळेवर आणि उच्च दाबाने न मिळाल्याने शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहे.

वीज बिले वेळेवर भरूनही नियमित वीज पुरवठा होत नाही. हा शेतकऱ्यांवरचा अन्याय आहे. विजेअभावी शेतामध्ये जळालेल्या पिकांचा तात्काळ पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संतप्त शेतकर्‍यांनी केली.