बंद व्यापार पुन्हा सुरु करावा; व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-नगर महानगरपालिका आयुक्त यांनी नुकतेच शहरातील घाऊक व किरकोळ किराणा भुसार व्यापार करण्याकरिता परवानगी दिली व त्यानंतर आज पुन्हा 17 पासून सर्व व्यापार बंद केला आहे.

यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान नुकतेच नवीन आदेशानुसार बाजारपेठ उघडल्यामुळे व्यापा-यांनी परराज्यातून मालाची खरेदी केली.

तसेच शेतकऱ्यांनी गाड्या भरून माल विक्रीकरिता नगर शहरात पाठविला आहे. येणारा माल नाशवंत व जीवनावश्यक असून तो उतरवून घेणे फार आवश्यक आहे.

त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की, माल उतरवून घेण्याकरिता दुकान उघडण्याची परवानगी व्यापाऱ्यांना द्यावी.

आपण परवानगी दिल्यास शेतकरी त्याचे होणाऱ्या नुकसाणीपासून वाचणार आहे. त्याचप्रमाणे नगर शहर विभागामध्ये कोरोना पॉजीटीव्ह बऱ्याच मोठ्याप्रमाणात कमी झालेले आहेत.

त्यामुळे नगर शहरातील अत्यावश्यक सेवेतील किराणा व्यापाऱ्यांना सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.

अहमदनगर शहरामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून घाऊक व किरकोळ किराणा मुसार व्यापार चालू करण्यास परवानगी द्यावी, असे अडते बाजार समितीच्या सचिव संतोष बोरा यांनी निवेदनात म्हटले आहे.