Ahmednagar Rain : शेतकऱ्यांची पिके धोक्यात,वरुण राजाला साकडे घालण्यासाठी पर्जन्य यज्ञ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Rain : पावसाची झालेली वक्रदृष्टी पाहता शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांची पिके धोक्यात आले आहेत. जनवारांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे देवळाली प्रवरा व गुहा येथील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी वरुण राजाला साकडे घालण्यासाठी पर्जन्य यज्ञ करण्यात आला आहे.

देवळाली प्रवरा येथील मॉर्निंग वॉकसाठी जाणारे राजेंद्र शेरकर, राजेंद्र लोंढे व बिटू पवार यांनी काल गुरुवारी सकाळी पर्जन्य यज्ञ करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार सर्व तयारी करून देवळाली प्रवरा हद्दीत नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या गवळी माळ येथे पर्जन्य यज्ञ करून पर्जन्य सुक्त पठण करून भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना केली. ”

यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, शेतकरी नेते राजेंद्र लोंढे, कामगार नेते नानासाहेब कदम, जिल्हा बँकेचे अधिकारी राजेंद्र शेरकर, बिटू पवार, सोसायटीचे संचालक मंजाबापू वरखडे, अनंत कदम, संजय कदम, गोरख कदम, सुभाष पठारे,

सुनील सिनारे, बाबासाहेब मोरे, शांताराम मोरे, सोमनाथ कोळसे, धनंजय कोळसे, प्रणय कोळसे, गिरीश कदम, संकेत दुस, प्रकाश ढुस, वसंत दौंड, गणेश बर्डे, अजित वरखडे, शरद वाबळे, सुधा कदम, हेमंत कदम, वसंत वरखडे, आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.