पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला आहे.
अशातच अर्थव्यवस्था सुस्तावल्याची आकडेवारी दिवसागणिक उजेडात येत आहे. त्यातच बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेत मंदी येणे, हा एक नियमित प्रकार आहे. विशेषत: श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अर्थव्यवस्था मंदावत असते.
यात काहीही नावीन्य नाही. तरीही मंदीच्या मुद्यावरून विरोधकांद्वारे उगीचच अकांडतांडव करणे चुकीचे आहे. मंदीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना अमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. याकरिता ३२ सूत्री दिलासा पॅकेजची घोषणा केंद्राने केली आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
- लंकेंविरोधात पंतप्रधानांना सभा का घ्यावी लागली ? रोहित पाटील यांचा सवाल
- Jijamata Senior College Bharti : पुणे जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयात ‘या’ जागांसाठी निघाली भरती, बघा शैक्षणिक पात्रता
- जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल त्याला सोडणार नाही – डॉ. सुजय विखे पाटील
- TISS Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स! टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समध्ये ‘या’ जागांसाठी निघाली भरती…
- Ahmednagar Politics : लोखंडेंसाठी फडणवीसांनी चमत्कार केला ? अहमदनगरधील राजकीय वैरी एकत्र..