दिल्लीत आगामी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने आम आदमी पक्ष मतदारांना आकर्षित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. मोफत मेट्रो, मोफत वीजनंतर आता केजरीवाल सरकार ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यावर विचार करत आहे.
‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यासंदर्भात एक कॅबिनेट नोट तयार केली जात असून लवकरच ती सरकारकडे पाठवली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत अरविंद केजरीवाल यांचे सरकार शेतकऱ्यांची विशेष काळजी घेत त्यांच्या पिकांच्या किमतीपेक्षा ५० टक्के अधिक देण्याची तयारी करत आहे.
ही योजना लागू झाल्यानंतर दिल्लीतील शेतकऱ्यांच्या गव्हाची किंमत प्रति क्विटंल २५०० रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. . या योजनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आम आदमी पक्ष (आप)चे सरकार या महिन्याच्या अखेरीस ही योजना लागू करण्याच्या विचाराधीन आहे.
याबाबतच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत जवळपास २० हजार शेतकरी कुटंब राहतात. या योजनेतून अनेक कुुटंबांना फायदा होणार आहे.
- तुम्ही देखील यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहात का? केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केल्या 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखा
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा: 1 लाख 60 हजार रुपये पर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्काबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश! वाचा माहिती
- कोटक महिंद्रा बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने केली कारवाई! पण आता खातेधारकांचे काय? वाचा ए टू झेड माहिती
- सरकारने दिलेली 99150 टन कांदा निर्यातीची परवानगी जुनीच! नवीन एक किलोही निर्यातीला परवानगी नाही? वाचा माहिती
- शेतीमाल वाहतूक व्यवसायासाठी 14 किमी प्रति लिटर मायलेज देणारी घ्या ही पिकअप! शेतकऱ्यांना ठरेल फायद्याची, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये