कर्जत : राज्यात सर्वात विकसित मतदारसंघ म्हणून कर्जत-जामखेडची वेगळी ओळख निर्माण होईल. या भागातील प्रश्न सोडवायचे आहेत. शिक्षण, रोजगारा बरोबरच सर्वात जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न पुढील काळात कायमचा सोडवला जाईल.
असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. दूरगाव (ता.कर्जत)येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुबारक शेख हे होते. प्रास्ताविकात दूरगावचे मा. सरपंच अशोक जायभाय म्हणाले की, गावागावात लावण्यात आलेल्या विकासाच्या बोर्डावर चुकीचा विकास दाखवण्यात आला आहे.
यावेळी ओंकार निंबाळकर, कांतिलाल लोंढे, डॉ.चंद्रकांत जायभाय, माधुरी लोंढे, नानासाहेब निकत आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. गेली पंधरा वर्षात विकासाची कामे झाली नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही अशा अनेक अडचणींचा पाढा येथील महिला ग्रामस्थांनी पवार यांच्यासमोर वाचला.
या मेळाव्यासाठी सुनिल शेलार, शहाजी निंबाळकर, राहुल नेटके, भारत मोघल, दादा परदेशी, जाकीर सय्यद, दत्ता पोटरे, सुभाष भगत, अजिनाथ जायभाय, सदाशिव निंबाळकर, सुरेश वाबळे, अमोल राजेभोसले, कैलास जायभाय, विजय क्षीरसागर, विष्णू परदेशी, दिपक शिंदे, मोहन गोडसे आदीसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या
- Home Loan: तुम्हाला जर 25 हजार रुपये पगार असेल तर किती मिळेल होम लोन? वाचा होमलोनचे कॅल्क्युलेशन
- शेणखताचा पिकांना फायदा होण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करावा वापर! नाहीतर फायदा होण्याऐवजी होईल नुकसान
- निव्वळ योगायोग ! पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील व फडणवीसांच्या भेटी, भाजप उमेदवारांना दिला पाठिंबा अन तिकडे शिखर बँकेकडून दिलासा, जप्तीची कारवाई मागे
- Health Tips: ‘या’ गोष्टींची काळजी घ्याल तर कधीच नाही होणार ऍसिडिटी! घ्या काळजी आणि मिळवा ऍसिडिटी पासून मुक्तता
- जयंत पाटलांना पोहोचवले अन् सुषमा अंधारेंना न्यायला आले, तेच हेलिकॉप्टर कोसळले अन डोळ्यादेखत तुकडेतुकडे झाले..