Business Idea: भावांनो दोन महिन्यात लाखोंची कमाई करायची ना…! मग पावसाळ्यात ‘या’ पिकाची शेती करा, लाखों कमवा; कसं ते वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea: भारतात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल घडून येत आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता पारंपरिक पिकांबरोबरच (Traditional Crops) अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत.

भाजीपाला पिकांची लागवड (Vegetable farming) करण्याची पद्धत आता दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील भाजीपाला शेतीतून आता चांगले उत्पन्न (Farmer Income) कमवीत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव आता पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला, फळे, मसाल्यांच्या पिकाच्या लागवडीवर भर देत आहेत, कारण ही पिके लवकर तयार होतात आणि त्यांना बाजारातही चांगला भाव मिळतो.

यामुळे शेतकरी बांधवांना कमी दिवसात अधिक उत्पन्न मिळते. परिणामी कमी दिवसात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होते. अशाच भाजीपाला पिकामध्ये कोथिंबीरचा समावेश होतो, ज्याच्या बिया मसाले म्हणून आणि पाने भाज्या म्हणून वापरतात. या भाजीपाला पिकाची मागणी बाजारात वर्षभर बघायला मिळते. यामुळे शेतकरी बांधव कोथिंबीर शेतीतून (Coriander Farming) बारामाही चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

जाणकार लोकांच्या मते, कोथिंबीरचे पीक शेतकऱ्यांना कमी कालावधीत बक्कळ उत्पन्न मिळते. कृषी तज्ज्ञांच्या मते, कोथिंबिरीला बाजारपेठेत मागणी जास्त असून त्या तुलनेने पुरवठा फारच कमी आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कोथिंबीर किंवा बियांना चांगला भाव मिळतो.  विशेषत: काही हंगामात कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडलेले असतात. यामुळेच योग्य हंगामात कोथिंबीरीचे उत्पादन घेऊन शेतकरी केवळ 2 ते 3 महिन्यांत खर्चापेक्षा जास्त नफा कमवू शकतात.

कोथिंबीर लागवड

चांगला निचरा होणाऱ्या आणि चिकणमाती असलेल्या शेतीजमिनीत कोथिंबीरची लागवड करण्याचा जाणकार लोक सल्ला देत असतात. अशा जमिनीत कोथिंबीर ची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते. विशेषतः ज्या बागायती भागात जमिनीचे तापमान 6.5 ते 7.5 असते तेव्हा कोथिंबिरीचे चांगले उत्पादन मिळते. त्याच्या लागवडीसाठी, जमीन सुपीक करून पेरणी करावी, त्यासाठी जमिनीची खोल नांगरणी केल्यानंतर सेंद्रिय आणि कंपोस्ट खत घालणे पुरेसे असेल.

कोथिंबीर शेतकरी बांधव फोंकून देखील परत असतात, ज्यामध्ये बियाणे घासून दोन भागांमध्ये मोडतात आणि शेतात शिंपडतात.

मात्र एका ओळीत धणे म्हणजेचं कोथिंबीर बियाणं पेरणे अधिक सोयीचे आहे, जेणेकरून व्यवस्थापनाचे काम सहज करता येईल.

शेतकऱ्यांना हवे असल्यास ते बांधावर पारंपरिक किंवा इतर बागायती पिकांसह कोथिंबिरीचे आंतरपीक घेऊ शकतात.

पिकापासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी, पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी, पहिले पाणी पाने तयार होण्याच्या अवस्थेत द्यावे.

कोथिंबीर पिकामध्ये दुसरे पाणी फांद्या निघण्याच्या वेळी म्हणजेच पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी दिले जाते.

70 ते 80 दिवसांनी फुले येण्याच्या अवस्थेत तिसरे पाणी द्यावे.

बियाणे तयार होण्याच्या वेळी म्हणजे सुमारे 90 ते 100 दिवसांनी चौथे पाणी देणे योग्य आहे.

पाचवे सिंचन 105 ते 110 दिवसांनी धान्य पिकवताना जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिले जाते.

कोथिंबीर काढणी आणि कमाई

कोथिंबीर भाजीपाला म्हणून पेरली असेल तर कोथिंबीरीचे पीक 45 ते 60 दिवसांत पिकते. दुसरीकडे, बियाणे म्हणजेच मसाल्यांच्या बाबतीत कोथिंबीर पिकण्यास वेळ लागतो. धणे कडक होऊन पाने पिवळी पडल्यावरच धणे काढले पाहिजे.

बाजारात कोथिंबीरीच्या भाजीची किंमत सामान्य भाज्यांइतकीच असते, मात्र काही वेळा त्याच्या भाजीची किंमत 300 रुपये किलोपर्यंत जाते.

त्याचबरोबर मसाल्यांसाठी कोथिंबीरीचा भावही 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.