Farmer Scheme: शेतकऱ्यांना अच्छे दिन आले..! आता मोदीजी शेतकऱ्यांना देणार तब्बल 15 लाख, वाचा काय आहे ही योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. साहजिकच देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवर (Farming) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्यासाठी मायबाप शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या कल्याणकारी योजना (Scheme) राबविल्या जातात.

2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित केल्या आहेत. पीएम किसान सम्मान निधि योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे.

यासोबतच मोदी सरकार शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आवश्यक उत्पादन खर्चाचे ओझे कमी कमी करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना (Farmers Producers Organization) ही योजना संपूर्ण देशात राबवत आहे.

या योजनेच्या माध्यमातून 2024 पर्यंत 10,000 शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्याचे उद्दिष्ट मोदी सरकार कडून ठेवण्यात आले आहे. शेतकरी उत्पादक संघटना ही एक सामूहिक कंपनी असते, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी जोडले जाऊ शकतात.

विशेष म्हणजे या संस्थांना चालवण्यासाठी केंद्र सरकार 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देते, जेणेकरून शेतकऱ्याला शेतीसाठी खते, बियाणे, खते, कीटकनाशके आणि यंत्रसामग्री वेळेवर खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे सोपे जाते. या योजनेचा थेट लाभ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकरी उत्पादक संघटना

•केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेत सामील होण्यासाठी डोंगराळ भागात जास्तीत जास्त 100 शेतकरी आणि मैदानी भागातील 300 शेतकरी जोडले जाऊ शकतात.

•या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 15 लाख रुपये मिळवायचे असतील तर किमान 11 शेतकऱ्यांच्या गटाला जोडून एक कंपनी तयार करावी लागते.

•मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मायबाप शासनाकडून दिला जाणारा हा निधी केवळ कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कंपनीच्या बँक खात्यात 3 वर्षात फिरत्या आधारावर हस्तांतरित केला जातो.

•शेतकर्‍यांना हवे असल्यास ते शेतीशी संबंधित कामासाठी शेतकरी उत्पादक संस्थेच्या निधीतून काही रक्कम कर्ज घेऊ शकतात, ती व्याजासह परत करावी लागेल.

•यामुळे शेतीसोबतच प्रक्रिया युनिट आणि मार्केटिंग सारखे खर्च भागवण्यास मदत होते.

•तथापि, शेतकरी उत्पादक संघटनेत सामील होऊन, आपण कृषी स्टार्ट-अप करून चांगला नफा कमवू शकता.

योजनेसाठी अर्ज कसा करावा

•ज्या शेतकऱ्यांना FPO म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटनेत सामील व्हायचे आहे, त्यांच्यासाठी भारत सरकारने पात्रता निश्चित केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याकडे भारतीय नागरिकत्व आणि शेतीयोग्य जमीन असणे अनिवार्य आहे.

•या योजनेत सामील होण्यासाठी, राष्ट्रीय कृषी बाजार (E-NAM) https://enam.gov.in/web/ च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.

•वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

•नवीन वेबपेज उघडताच, नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर स्क्रीनवर नोंदणी फॉर्म उघडेल.

•या नोंदणी फॉर्ममध्ये सर्व माहिती योग्यरित्या भरा आणि विनंती केलेली कागदपत्रे अपलोड करा.

•शेवटी, सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर, अर्ज पूर्ण होईल.

•अधिक माहितीसाठी शेतकरी उत्पादक संस्था योजनेच्या टोल फ्री क्रमांक -1800 270 0224 वर संपर्क साधू शकतात.