Ginger Farming: ऐकलं व्हयं…! अद्रक लागवड करा अन कमी वेळेत, कमी खर्चात, लाखों कमवा; कसं ते वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ginger Farming: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात पिक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. शेतकरी बांधव आता अधिक नफा देणाऱ्या नगदी पिकांची शेती (Farming) करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होत आहे.

शिवाय मायबाप सरकार देखील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूने नगदी पिकांची (Cash Crop) शेती करण्यास प्रोत्साहन देत आहे. कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना नगदी पिकांची शेती करण्याचा सल्ला देतात.

अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी एका नगदी पिकांच्या शेतीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आम्ही शेतकरी मित्रांसाठी अद्रक शेती (Ginger Cultivation) विषयी बहुमूल्य माहिती सांगणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया अद्रक शेती विषयी.

मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, आल्याची लागवड उष्ण व दमट ठिकाणी केल्यास यापासून चांगले उत्पादन मिळते. अद्रकची अर्थात आल्याची लागवड कंदाच्या रूपात केली जाते. मध्यम पावसाच्या वेळी आल्याच्या गाठी सेट कराव्या लागतात. आले हे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशातील पीक आहे. 

आल्याचा वापर मसाला, ताजी भाजी आणि औषध म्हणून केला जातो. भारतात आल्याची लागवड 136 हजार हेक्टर आहे, जी उत्पादित केलेल्या उर्वरित मसाल्यांमध्ये मुख्य आहे.  भारतामध्ये केरळ, ओरिसा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम या राज्यांमध्ये आल्याची लागवड मुख्य व्यावसायिक पीक म्हणून केली जाते.

आपल्या राज्यातही थोड्याबहु प्रमाणात आल्याची लागवड केली जाते. सध्या अनेक शेतकऱ्यांना अद्रक लागवडीतून अधिक फायदा होत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही आल्याच्या लागवडीतून अधिक फायदा मिळवायचा असेल, तर अद्रकाची लागवड करून योग्य उत्पादन कसे मिळवायचे ते जाणून घेऊया.

अद्रक शेतीसाठी हवामान – आल्याची लागवड उष्ण व दमट ठिकाणी केली जाते. अद्रक पिकासाठी उष्ण व समशीतोष्ण उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक आहे. आले पिकासाठी उन्हाळी हंगाम अधिक योग्य असतो, उन्हाळी हंगामात त्याचे कंद चांगले वाढतात. आले रोपाला उगवण होण्यासाठी 20 ते 25 अंश तापमान आवश्यक असते, कंद पिकताना 30 ते 35 अंश तापमान आवश्यक असते.

अद्रक लागवडीची तयारी – आले लागवड करण्यापूर्वी शेत तयार करावे. शेत महिनाभर अगोदर तयार केली जातात. त्यासाठी जमीन पल्टी नांगराने नांगरून घ्यावी. नांगरणीनंतर काही वेळ शेत मोकळे सोडावे जेणेकरून शेतातील मातीत सूर्यप्रकाशास चांगला पडेल. जेणेकरून शेतातील हानिकारक कीटक मरण पावतील.

यानंतर शेतात पाणी टाकून कुजलेले शेणखत टाकून अद्रकाची लागवड करावी. दक्षिण भारतात एप्रिल ते मे या कालावधीत पावसाळी पीक म्हणून अद्रकची शेती केली जाते. तर आले हे मध्य आणि उत्तर भारतातील कोरडवाहू पीक आहे, ज्याची पेरणी एप्रिल ते जून या कालावधीत केली जाते.

अद्रक शेतीसाठी जमीन – अद्रक लागवड करण्यासाठी चिकणमाती असलेली शेतीजमीन ज्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते, ती जमीन उत्तम असते. यासोबतच जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. निचऱ्याच्या कमतरतेमुळे कंदांचा विकास चांगला होत नाही. यामुळे पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. आले लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य 5.6 च्या दरम्यान असावे.

बियाण्याचे प्रमाण – मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे  की, शेतात बियाणे पेरले जात नाही, तर त्याचे कंद बियाणे म्हणून वापरले जातात. यासाठी 6 ते 8 महिने कालावधीच्या पिकातुन कंद काढले जातात. मैदानी प्रदेशात प्रति हेक्‍टरी 15 ते 18 क्विंटल एवढी कंदाची मात्रा पुरेशी असते.

पेरणीची पद्धत – आल्याच्या बिया त्याच्या कंदांच्या स्वरूपात पेरल्या जातात, त्याचे rhizomes किंवा कंद 40 सेमी अंतराने पेरले पाहिजेत. पेरणीनंतर हे राइझोम कुजलेल्या शेणाच्या साहाय्याने किंवा मातीने झाकून टाकावे.