Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजनेची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली. या योजनेत केंद्र सरकार (Central Govt) गरीब कुटूंबांना आरोग्य विमा (Health insurance) उपलब्ध करून देते.
या योजनेंतर्गत केंद्र सरकार लाभार्थी व्यक्तींना आयुष्मान गोल्डन कार्ड (Ayushmann Golden Card) देत आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बलतेमुळे मूलभूत आरोग्य सुविधांना मुकणाऱ्या लोकांना या योजनेचा फायदा होऊ शकतो.