औरंगाबादमध्ये फडणवीसांच्या गाडीला रस्ता करून देण्यात दानवेंचा पुढाकार, फडणवीस म्हणाले..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aurangabad : पाणी प्रशांवरून चालू असलेल्या मोर्चातून काल औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस (Devedra Fadanvis) यांची गाडी मोर्चातून जात होती. मात्र त्यांच्या गाडीला जायला रस्ता नव्हता. त्याचवेळी भाजपचे (Bjp) नेते रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) भाजपचा झेंडा हातात घेऊन कार्यकर्त्यांना बाजूला केले आहे.

गाडी पुढे सरकरण्यास अडचण होत असल्याचे दानवे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना बाजूला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायल झाला आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये (Aurangabad) पाणीटंचाईमुळे लोकांची अवस्था बिकट आहे. कडाक्याच्या उन्हात उष्णतेची लाट उसळली आहे. अशा परिस्थितीत पाण्याची टंचाई ही लोकांसाठी मोठी समस्या बनली आहे.

त्यामुळे औरंगाबादमध्ये सोमवारी फडणवीस यांच्यासह कार्यकर्त्यांनी जलसंकटावर निषेध मोर्चा काढला. या ‘जल आक्रोश मोर्चा’मध्ये शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) यापूर्वीच मंजूर केलेल्या योजनांना स्थगिती दिली आहे, असे फडणवीस यांनी सोमवारी सांगितले आहे. तर आधीच्या दिवशी रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यासह पक्षाच्या ‘जल आक्रोश मोर्चा’मध्ये सहभागी झाले होते.

दरम्यान, फडणवीस म्हणाले की, मुंबई (Mumbai) आणि महानगरापलीकडे महाराष्ट्र आहे, असे महाविकास आघाडी सरकारला वाटत नाही. त्यांनी मराठवाडा विकास मंडळाला मारले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ संपुष्टात येईल अशा योजना रखडल्या आहेत.

राज्य सरकारने पाण्याची पाइपलाइन योजना रखडवली आणि निविदा व्यवस्थित होईपर्यंत काम सुरू होऊ दिले नाही. ज्या गतीने त्यांच्या हाताखाली काम सुरू आहे ते येत्या २५ वर्षांत पूर्ण होणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.