नगर जिल्‍ह्यातील ऑक्‍सीजन संपल्‍यानंतरही तीन मंत्र्यांची कर्तबगारी शुन्‍यच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  महाभकास आघाडी सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन पुर्णपणे कोलमडले आहे. कुठल्‍याही यंत्रणेवर सरकारचे नियंत्रण राहीलेले नाही.

सरकारचा टास्‍कफोर्स करतोय काय? असा सवाल उपस्थित करतानाच नगर जिल्‍ह्यातील ऑक्‍सीजन संपल्‍यानंतरही तीन मंत्र्यांची कर्तबगारी शुन्‍यच दिसली.

पालकमंत्र्यांनाही जिल्‍ह्यातील गंभिर परिस्थितीपेक्षा गोकुळ दूध संघाची निवडणूक महत्‍वाची वाटत असल्‍याची घणाघाती टिका भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

जिल्‍ह्यात काल ऑक्‍सीजनची परिस्थिती बिकट झाल्‍याच्‍या पार्श्‍वभूमिवर आ.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधताना या निष्‍क्रीय कारभाराला पालकमंत्र्यांसह जिल्‍ह्यातील तीनही मंत्री जबाबदार असल्‍याचा थेट आरोप केला.

जिल्‍ह्यातील रुग्‍णालयांना मंजुर असलेला ऑक्‍सीजनचा कोठा पुणे जिल्‍ह्यातील आधिका-यांनी कोणतीही पुर्व सुचना न देता अडवून ठेवत इतर जिल्‍ह्यात वळविण्‍याचा प्रयत्‍न केला.

ही माहीती आपल्‍याला समजल्‍यानंतर याबाबत आपण मुख्‍यमंत्र्यांशी बोलून या गंभिर परिस्थितीकडे लक्ष वेधले. त्‍यानंतर राजंणगाव येथे आडवून ठेवलेले ऑक्‍सीजनचे टॅंकर नगर जिल्‍ह्यात येण्‍याचा मार्ग मोकळा झाला.

याबाबत पालकमंत्र्यासह जिल्‍ह्यातील तीनही मंत्र्यांचा निष्‍काळजीपणाच समोर आला. त्‍यांची कर्तबगारीही सिध्‍द झाली, प्रत्‍येक निर्णयात जर मुख्‍यमंत्र्यांना लक्ष घालावे लागत असेल तर मंत्री करतात काय? असा थेट सवाल त्‍यांनी उपस्थित केला.

महाभकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा सर्ववेळ भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर टिका करण्‍यात जात आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांना दिल्‍लीतून मदत आणण्‍याचे सल्‍ले देणा-यांची कोव्‍हीड काळात जिल्‍हृयात कर्तबागारी काय? असा खोचक सवाल सवाल करुन मंत्री थोरातांवर त्‍यांनी निशाणा साधला.

सातत्‍याने केंद्र सरकार विरोधी पक्षला बेजबाबदार वक्‍तव्‍यातून लक्ष करणारे मंत्री नबाब मलीक स्‍वत:ला समजतात तरी काय. राज्‍याकरीता विरोधी पक्षनेत्‍यांनी ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्‍शन उपलब्‍ध करुन तरी आणले.

पण विनाकारण त्‍याचेही राजकारण झाले. या इंजेक्‍शन बाबत केंद्रीय मंत्री आणि राज्‍याच्‍या आरोग्‍य मंत्र्यांनी खुलासा करुन सर्व वस्‍तुस्थिती स्‍पष्‍ट केली. पण या दरम्‍यान इंजक्‍शन अभावी बळी गेलेल्‍या नागरीकांची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने घेतली पाहीजे.

नगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री एक दिवस आले आणि फक्‍त घोषणा करुन गेले. इतर मंत्रीही फक्‍त आढावा बैठका घेत बसले. जिल्‍ह्यातील जनतेची काळजी कोण घेणार.

वास्‍तविक जिल्‍हृयात एवढी भयानक परिस्थिती असताना पालकमंत्र्यांनी जिल्‍ह्यात तळ ठोकायला हवा होता, परंतू त्‍यांना जिल्‍ह्यातील जनतेपक्षाही त्‍यांच्‍या गो‍कूळ दूध संघाची निवडणूक अधिक म‍हत्‍वाची वाटत असल्‍याचा टोला आ.विखे पाटील यांनी लगावला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|