Grah Gochar : दिवाळीपूर्वी 3 ग्रहांच्या संयोगामुळे ‘या’ राशींना होणार नुकसान, वाढतील अडचणी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Grah Gochar : ग्रहांच्या राशी बदलांमुळे शुभ आणि अशुभ असे दोन्ही योग तयार होतात. ग्रहांच्या बदलांचा थेट पृथ्वीवर परिणाम होतो. तसेच त्या-त्या राशीच्या लोकांच्या जीवनात बदल दिसून येतात. दरम्यान, तूळ राशीमध्ये तीन ग्रहांच्या संयोगामुळे अशुभ आणि विनाशकारी क्रूर त्रिग्रही योग तयार होत आहे, ज्याचा काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. 

सूर्य, ग्रहांचा राजा, तूळ राशीत प्रवेश केला आहे. दरम्यान, मंगळ आणि केतू ग्रह आधीच येथे उपस्थित आहेत. या अशुभ योगाचा अशुभ प्रभाव तीन राशींवर सर्वाधिक राहील, त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची देखील दाट शक्यता आहे. या काळात अपघात होऊ शकतो. तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चला कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना काळजी घेण्याची गरज आहे पाहूया…

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग खूप अशुभ मानला जात आहे, या काळात या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. कुटुंबात वाद होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध बिघडू शकतात. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते. मानसिक तणाव वाढू शकतो, वाहन चालवताना काळजी घेणे फार महत्वाचे आहे, डोकं शांत ठेवा, आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठीही हा योग अशुभ मानला जात आहे. या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मुलाला त्रास होऊ शकतो. प्रेमसंबंध बिघडू शकतात. कुठेही गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला, अन्यथा नुकसान होऊ शकते.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी येणारे काही दिवस फारसे चांगले नसणार आहेत. या काळात व्यवसायात नुकसान होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. अपघात होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. त्यामुळे थोडा संयम बाळगा.