मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.
यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.
राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले असतानाही राज्यात नव सरकार स्थापन झालेलं नाहीये.
निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने ५६ जागां जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडे गेल्या आहेत.
- उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी ! पालेभाज्या तेजीत
- अहमदनगरचा जवान सुट्टीवर आला ! ईव्हीएम हॅकसाठी अडीच कोटींची मागणी…
- Dream Astrology : स्वप्नात कावळा दिसणे शुभ की अशुभ, जाणून घ्या सविस्तर…
- Ahmednagar News : कांद्याचे भाव पुन्हा कोसळताच शेतकरी संतप्त ! संगमनेरात लिलाव बंद पाडले तर अकोलेत रास्ता रोको
- Ahmednagar Politics : ‘जेल का जवाब वोट से देंगे’ ! नगरमधील मोदींच्या सभेत पहिल्याच रांगेत झळकवला फलक, पोलिसांनी घेतले ताब्यात