मुंबई: लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.
आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आमच्याशी आघाडी नकोच आहे.
आता विधानसभेलाही त्यांना वेगळेच लढायचे आहे. वंचितमुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. जनतेने लोकसभेत जी चूक केली ती पुन्हा विधानसभेत करणार नाहीत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत मित्रपक्षांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
- एसआयपीत गुंतवणूक करून होता येते करोडपती! 20 वर्ष 5 हजाराची गुंतवणूक बनवते तुम्हाला करोडपती,परंतु करावे लागेल हे काम
- Ahmednagar Breaking : झाडाला धडकून कार उलटली, त्यानंतर घेतला पेट ! मुले मुली काचा फोडून बाहेर येत पसार..’नाजूक’ संबंधाची किनार?
- Profitable Business Idea: 50 हजाराची गुंतवणूक महिन्याला देईल 30 ते 40 हजार रुपयांची कमाई! वाचा या अनोख्या व्यवसायाची माहिती
- OnePlus : वनप्लसचा ‘हा’ फोन भारतात लॉन्च होताच करेल धमाका, असतील खूप खास फीचर्स, किंमतीही कमी…
- Multibagger stocks : लाँच होताच आयपीओचा धुरळा, पाहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिला दुप्पट परतावा…