औरंगाबाद – औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात ओवेसी यांना हिरवा साप म्हटले होते. यासह त्यांनी लावलेला झेंडा उखडून फेकण्याचे आवाहन जाहीर सभेत केले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना शुक्रवारी ओवेसी म्हणाले की, मी लावलेला झेंडा काही बांबूत लावलेला नाही.
तो औरंगाबादकरांच्या मनात लावलेला असून तो यापुढे कायम राहणार आहे. भीतीचे राजकारण करून सत्ता भोगण्यात भाजप आणि शिवसेना अग्रेसर आहे. त्यांच्या भूलथापांना मतदारही बळी पडतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३७ टक्के हिंदू समाज भाजपच्या पाठीशी होता.
त्याचे प्रमाण २०१९ मध्ये ४४ टक्के झाले असून, सहा टक्के मुस्लिम मतदारांनीही त्यांना मदत केल्याचे आकडे खासदार ओवेसी यांनी सभेत मांडले. मात्र, वंचित समाजासह मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार हात आखडता घेते. त्यामुळे आपले प्रश्न, समस्या मांडण्यासाठी आपल्या माणसांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले.
- Ahmednagar Politics : गावपातळीवरील पॅनल-पॅनलमधील वाद लंके-विखेंना भोवणार ? प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनुचित प्रकारांमुळे अचानक गणिते बदलली
- Ahmednagar Politics : ‘धनी’ प्रचारात व्यस्त ! कारभारणींच्या भेटीगाठी राजकीय गणिते बदलवतायेत, राणीताई लंकेंच्या पायाला भिंगरी, धनश्रीताईही आघाडीवर, नेत्यांपेक्षा लोकांना ‘ताईं’च्या अपेक्षा
- करा ‘हे’ काम नाही तर 1 जूनपासून नाही करता येणार जनावरांची खरेदी विक्री आणि नाही मिळणार पशुवैद्यकीय सेवा! वाचा माहिती
- तेलबियांची लागवड आणि त्यातून तेल निर्मिती करण्याचा उभारला व्यवसाय! हा तरुण शेतकरी कमवत आहे लाखो रुपये, वाचा यशोगाथा
- Ahmednagar News : शेतात रोटा मारत होता शेतकरी, ट्रॅक्टर पलटी झाला अन त्याखाली दबून मृत्यू झाला