औरंगाबाद – औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात ओवेसी यांना हिरवा साप म्हटले होते. यासह त्यांनी लावलेला झेंडा उखडून फेकण्याचे आवाहन जाहीर सभेत केले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना शुक्रवारी ओवेसी म्हणाले की, मी लावलेला झेंडा काही बांबूत लावलेला नाही.
तो औरंगाबादकरांच्या मनात लावलेला असून तो यापुढे कायम राहणार आहे. भीतीचे राजकारण करून सत्ता भोगण्यात भाजप आणि शिवसेना अग्रेसर आहे. त्यांच्या भूलथापांना मतदारही बळी पडतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३७ टक्के हिंदू समाज भाजपच्या पाठीशी होता.
त्याचे प्रमाण २०१९ मध्ये ४४ टक्के झाले असून, सहा टक्के मुस्लिम मतदारांनीही त्यांना मदत केल्याचे आकडे खासदार ओवेसी यांनी सभेत मांडले. मात्र, वंचित समाजासह मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार हात आखडता घेते. त्यामुळे आपले प्रश्न, समस्या मांडण्यासाठी आपल्या माणसांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले.
- Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये ‘वंचित’च्या उमेदवाराच्या कारवर हल्ला ! दगडे आली..पावडर तोंडात उडाली..काचा भर्रकन उडाल्या..’असा’ घडला थरार..
- Lakshmi Narayan Rajyog : ‘या’ राशीच्या लोकांचे उजळेल भाग्य, मिळेल अफाट संपत्ती आणि यश…
- मुगाच्या ‘या’ वाणाची लागवड करा आणि मिळवा हेक्टरी 12 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन! लागवडीनंतर 70 दिवसात येईल हातात पैसा
- Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मजाच मजा, ‘या’ बँका एक लाखाच्या गुंतवणुकीवर देत जबरदस्त परतावा, बघा व्याजदर…
- PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १५० पदांसाठी भरती सुरु, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!