श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले
याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले.
काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते बोलत होते. ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवाजीराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, ज्ञानदेव गवते,
सरपंच सुलोचना वाघ, वैभव पाचपुते, संदीप पाचपुते, अमोल पवार, बन्सी महाराज पाचपुते, विकास पाचपुते, बाळासाहेब धुमाळ, महेश दरेकर, नवनाथ राहिंज, अनिल पाचपुते उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे सुरू आहेत. ज्यांना निवडून दिले ते याचे श्रेय घ्यायला निघालेत, अशी टीका पाचपुतेंनी आमदार राहुल जगतापांचे नाव न घेता केली.
- State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाची ‘ही’ योजना करेल मालामाल, फक्त करा 1 लाख रुपयांची गुंतवणूक…
- Axis Bank FD : ॲक्सिस बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना दिली भेट, वाचा ही बातमी…
- Ahmednagar Politics : विखे व मुंडे परिवाराला यंत्रणांचा वापर करून त्रास दिला गेला ? खा. सुजय विखेंच्या पवारांबाबतच्या गौप्यस्फोटानंतर चर्चांना उधाण
- Upcoming Cars : नवीन कार खरेदी करत असाल, तर थोडं थांबा! या महिन्यात लॉन्च होत आहेत तीन जबरदस्त कार्स…
- LIC Policy: एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीत दरमहा 1358 रुपये रुपये जमा करा आणि मिळवा 25 लाख रुपयाचा फंड! मिळतील अनेक फायदे