श्रीगोंदे :- पंधरा दिवसांच्या आत एफआरपी देण्याचा नियम असताना मुख्यमंत्र्यांनी अभय दिल्यामुळे साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे पेमेंट थकवले. कायदा पाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी झटकल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काच्या पैशांची भीक मागण्याची वेळ आली, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी श्रीगोंदे येथे केला.
गेल्या तीन दिवसांपासून संभाजी ब्रिगेडसह ऊस उत्पादकांचे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप आणि साईकृपा कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुरु आहे.
पाटील यांनी तेथे भेट देऊन राज्यभरातील शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. या वेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, युवराज चिखलठाणे, संदीप कुनगर, घनश्याम गोडसे, दिलीप वाळुंज, दिलीप लबडे उपस्थित होते.
- अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित
- आरोग्य व्यवस्थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहमदनगर : स्वतःच्या जमिनीत सापडलेले गुप्तधन परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका ! सुनावणी सुरु, आतापर्यंत काय-काय घडलं ?
- NCL Pune Bharti 2024 : NCL पुणे मध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी!
- भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले ! पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा