शेतकऱ्यांसाठी अक्षय तृतीयेच्या पर्वावर मोठा निर्णय ! ‘ही’ अपघात सुरक्षा अनुदान योजना महाराष्ट्रात लागू, 2 लाखाचा मिळणार लाभ, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल करण्यात आला आहे. आता राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाणार आहे. वास्तविक पूर्वीची योजना ही अपघात विमा योजना होती.

जुन्या योजनेनुसार कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपघात विमा मंजूर होत होता. मात्र अनेकदा कंपनीकडून विमा देताना दावे वेळेत मंजूर न करणे, उगाच त्रुटी काढून दावे नाकारण्याचे प्रकार होत असल्याचा प्रकार समोर आला होता.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ मार्गांवर विकसित होणार तीन मजली उड्डाणपुल; पहा काय आहे प्लॅन

यामुळे कृषी विभागाकडून या योजनेत बदल करण्याची मागणी केली जात होती. यानुसार शिंदे फडणवीस सरकारने पूर्वीची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बंद केली आहे. आता राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाणार आहे.

या योजनेची घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दरम्यान आता या योजनेची अंमलबजावणी 19 एप्रिल 2023 पासून राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अक्षय तृतीयाची ही एक भेटच समजली जात आहे.

हे पण वाचा :- धक्कादायक ! महाराष्ट्रात दर पाच तासात एक शेतकरी आत्महत्या; शिंदे सरकारच्या काळातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी

कशी असेल नवीन योजना

  • या नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेनुसार केव्हाही शेतकऱ्याचा अपघात झाला तरीही शेतकऱ्याला अपात्र ठरवले जाणार नाही.
  • मात्र जर एखाद्या शेतकऱ्याने शासनाकडून अपघातग्रस्तांसाठी सुरू असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या नवीन योजनेनुसार अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्याच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.

असे झाल्यास मिळणार लाभ

  • शेतकऱ्याचा रस्ता किंवा रेल्वे अपघात झाल्यास लाभ मिळणार आहे. 
  • कीटकनाशके हाताळताना किंवा अन्य कारणास्तव विषबाधा झाली तर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. 
  • विजेचा शॉक लागून अपघात झाला तर लाभ मिळेल.
  • वीज पडून मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. 
  • खून, उंचावरून पडून अपघात झाल्यास लाभ दिला जाणार आहे. 
  • सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांनी केलेली हत्या या प्रकरणात देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
  • जनावरांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. 
  • बाळांतपणात मृत्यू झाल्यास लाभ देण्याचे प्रावधान आहे. 
  • दंगल किंवा अन्य कोणत्याही अपघातात जखमी झाल्यास शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! दूरदर्शन मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; पगार तब्बल 40 हजार पार, वाचा सविस्तर