छत्तीसगडच्या सरगुजा (अंबिकापूर) मध्ये प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी वेगळी योजना गांधी जयंतीपासून सुरू होत आहे. या अंतर्गत प्लास्टिक कचरा वेचणाऱ्यांना जेवण-नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. यासाठी ‘गार्बेज कॅफे’ही बनवला जात आहे.
अंबिकापूरच्या महापालिकेने शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त बनवण्यासाठी या योजनेची एक महिन्यापूर्वी घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश शहराला संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त बनवणे हा आहे. ही योजना अशी तयार केली आहे की, जे नागरिक कचरा वेचण्याचे काम करतात, त्यांना कचऱ्याच्या बदल्यात जेवण आणि नाष्टा दिला जाईल.
महापालिकेचे सभापती शफी अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक किलो प्लास्टिक कचरा घेऊन येणाऱ्यास ४० रुपयांचे जेवण आणि ५०० ग्राम कचऱ्यावर २० रुपयांचा नाष्टा संंबंधित व्यक्तीला दिला जाईल. यासाठी बसस्थानकांवर ‘गार्बेज कॅफे’ तयार करण्यात येत आहे.
२ ऑक्टोबरपासून तो सुरू होईल. यामुळे शहर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त बनवण्यात मदत होईल. यातून रस्ते, नाल्यात पडलेला प्लास्टिक कचरा एकत्र होईल आणि दुसऱ्या बाजूला कचरा वेचणाऱ्यांना जेवण आणि नाष्टाही मिळेल.
नुकतेच अंबिकापूरला इंदूरनंतर देशातील दुसरे सर्वात स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. या कॅफेत एकत्र होणारे प्लास्टिक सिमेंट उद्योगात जाळण्यासाठी आणि रस्ते बनवण्यासाठी वापरण्यात येईल.
- Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली घराच्या प्रगतीसाठी असतात महत्त्वाच्या आणि पतीला देतात प्रत्येक पावलावर साथ! वाचा माहिती
- Railway Ticket Booking: तिकीट एजंटकडून रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करत आहात का? जरा थांबा,नाहीतर होऊ शकतो मनस्ताप
- Success Story: वडिलांसोबत ऊस तोडणीचे काम करत केला अभ्यास! आता कष्टाने झाली फौजदार, वाचा या कन्येची यशोगाथा
- शहापूरकर यांनी घेतली दुग्ध व्यवसायात भरारी! 40 पंढरपुरी म्हशींच्या पालनातून महिन्याला करतात साडेचार लाखांची कमाई
- रेल्वेत 8 हजार तर स्टाफ सिलेक्शनमध्ये 3 हजारपेक्षा जास्त पदांसाठी मेगाभरती