तिघाडीचे शासन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची धोरणे राबवतय !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोपरगाव :राज्यात सत्तेवर आलेले तिघाडीचे शासन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची धोरणे राबवत असून शेतकरी खरोखरच जगावायचं असेल, तर त्याची येथून मागची सर्व वीज बिले माफ करावी.

दिलेल्या आश्वासनानुसार सातबारा उतारा कोरा करा, शासनाने पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी वाढवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली असून त्याची आकारणी पूर्वीप्रमाणेच करावी, अशी मागणी संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचा ५७ व्या गळीत हंगामाची सांगता फकीरराव व वंदना बोरणारे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी कोपरगाव आद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, सर्व संचालक, उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे, सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, राजेंद्र सूर्यवंशी, कार्मिक अधिकारी प्रकाश चांदगुडे, कामगार नेते मनोहर शिंदे आदींनी स्वागत केले. ३ लाख ५८ हजार ३५४ टन उसाचे गाळप झाले, असे कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment