सत्ताधाऱ्यांच्या वसुलीमुळे नागरिकांवर आत्महत्येची वेळ आली…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- कोरोनाचे संकट आले असल्याने संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. हाती काम नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत असताना मात्र शिर्डीमध्ये सत्ताधारी नागरिकांचा छळ करत आहे.

त्यांच्याकडून वसुली करत आहे. नगरपंचायतचे कर्मचारी सक्तीने घरोघरी जाऊन करवसुली करत आहेत. करवसुली बरोबर दंड, व्याज आकारण्यात येत आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांना आत्महत्येची वेळ आली आहे.

दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत असून सत्ताधारी गटात हिम्मत असेल तर टोलनाके सुरू करुनच दाखवा, असा इशारा, शिर्डी शिवसेनेच्यावतीने मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना लेखी पत्राद्वारे देण्यात आला.

दरम्यान मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतचे निष्क्रिय पदाधिकारी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे, साईभक्तांकडून करवसुली करून शिर्डीच्या जनतेला व साईभक्तांना लक्ष्य करून त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तसेच नगरपंचायतने खोटी सर्वसाधारण सभा घेऊन भक्तांवर टोलनाक्याच्या माध्यमातून कर वसुली करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. मात्र अशी सभा झालेली नाही.

गैरहजर नगरसेवकांच्या खोट्या सह्या घेऊन लूटमारीचा निर्णय घेण्यात आला आहे. या ना त्या मार्गाने पैसे वसूल करणे एवढाच सत्ताधारी व त्यांचे नेते यांनी एकमेव निर्णय घेतला आहे. या प्रवृत्तीचा आम्ही शिवसेनेच्यावतीने निषेध करीत आहोत. मात्र सत्ताधाऱ्यांची दादागिरी खपवून घेणार नाही, असा दम शिवसेनेने दिला आहे.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर