अहमदनगर – दुचाकी चोरत त्याची विक्रीतुन मिळणाऱ्या पैशावर गोव्याला जाऊन एन्जॉय करणाऱ्या टोळीस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले.
त्यांच्याकडून 11 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ज्ञानेश्वर देविदास चव्हाण राजेंद्र नानासाहेब काकडे अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचा साथीदार श्याम उर्फ अक्षय गवळी हा फरार आहे.
पाईपलाईन रोड वरील वैभव चंद्रसेन राव जगताप यांची 9 मे रोजी चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंग मधून दुचाकी लंपास केली होती. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
शहरात व उपनगरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शहरात व उपनगरात चोरी करणारी टोळी जेरबंद केली.
या चोरट्यांनी पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न कार्य समारंभासाठी बाहेरून येणाऱ्या गाड्या लंपास करतात.
कागदपत्र नंतर देण्याच्या बोलीवर ते गाड्या विकत. या विक्रीतून आलेल्या पैशातून ते गोव्याला जाऊन एन्जॉय करत असल्याचे या चोरीच्या घटनांमधून उघड झाले आहे.
- Best Investment Plans : मोदी सरकारची जबरदस्त योजना, महिलांना गुंतवणुकीवर मिळत आहे बंपर व्याज…
- संजय राऊत स्पष्टच बोलले ! लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उडाला
- Maruti Suzuki : मारुतीची ‘ही’ कर जीएसटी फ्री! 1.02 लाख रुपयांपर्यंत होणार बचत…
- पोस्ट ऑफिस FD की नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम, कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली तर मिळणार जोरदार परतावा? वाचा सविस्तर
- वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ५५ मेंढ्या मृत्युमुखी ! मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर