अहमदनगर :- नगर तालुक्यातील हातवळण येथे मुलीला पळवून नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकाला मारहाण केली आहे.
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारहाण करणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अंबादास सोन्याबापू जगताप (रा. मठपिंप्री, नगर) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रंगनाथ मेटे, सुमीत भानुदास जपे, दत्तात्रय कारभारी जपे, सागर दत्तात्रय जपे, सचिन कारभारी जपे (रा. हातवळण) यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावातील एका तरुणाने मुलीला पळवून नेले आहे. त्यातून वाद झाले होते. त्यावेळी मठपिंप्री येथील अंबादास जगताप हे चारा छावणीमध्ये गेले.
त्या वेळी वाद होऊन जगताप यांना पाच जणांनी काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
- मानवतेची सेवा करणाऱ्या लंके यांना संसदेत पाठवा शरद पवार यांचे आवाहन श्रीगोंदे येथे पवार यांची जाहिर सभा संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती
- भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांचा पारनेरात उद्रेक बाजार समितीतील लिलाव बंद पाडले पारनेर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन
- SUV खरेदी करणाऱ्यांना बसणार मोठा फटका ; महाग झाली ‘ही’ लोकप्रिय एसयुव्ही कार !
- डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही !
- गुड न्यूज ! भारतीय बाजारात लॉन्च झाली 170 किलोमीटरची रेंज असणारी ‘ही’ नवीन Electric Scooter ; किंमतही खिशाला परवडणारी, पहा…