कर्जत : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही; परंतु ठराविक उद्योजकांसाठी मोठ-मोठ्या सवलती दिल्या जातात, याला नेमकं काय म्हणायचं? भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांची मोठी उपेक्षा केली असून, त्याची किंमत आता त्यांना मोजावी लागणार आहे.
मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. महाआघाडीच्या कर्जत येथील सभेत बोलताना पवार यांनी भाजप-सेना युती सरकारच्या कारभारावर चांगलेच तोंडसुख घेतले.
सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस असूनही सभेला चांगली गर्दी होती. ते पुढे म्हणाले की, खोटं बोला परंतु रेटून बोला, यातच भाजप-सेना युतीचे नेते पटाईत आहेत. पाच वर्षांत युती सरकारकडून कुठल्याच प्रकारची प्रभावी कामे झाली नाहीत, कुठलीच आश्वासने सरकारने पाळली नाहीत.
भाजप-सेना युती सरकारने पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाच निर्णय घेतला नाही. ना कर्जमाफी, ना पीकविमा, ना कुठल्याच शेतीमालाला हमीभाव. युती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, त्या युती सरकारला मते मागण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
- 4 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ 2 कार आहेत मध्यमवर्गीयांची पहिली पसंत ; मायलेज अन फिचर्स कसे आहेत ? वाचा सविस्तर
- Rent Agreement: भाड्याच्या घरात राहायला जायचे असेल तर ‘या’ गोष्टींकडे काळजीपूर्वक द्या लक्ष! नाहीतर सापडाल अडचणीत
- Ahmednagar News : विधवेस मारहाण, महिलेचे घर जाळले ! अहमदनगरमध्ये ‘येथे’ स्थनिक गुंडाची दहशत
- TISS Mumbai Bharti 2024 : TISS मुंबई मध्ये निघाली 50 हजाराची नोकरी, बघा शैक्षणिक पात्रता काय आहे?
- घर- फ्लॅट खरेदी करण्यासाठी होम लोन घ्यायचे तर किती पगार असावी? ‘या’ सूत्रानुसार करा नियोजन नाहीतर हप्ते भरण्यातच जाईल आयुष्य