पोपटराव पवारांनी दिला शेतकऱ्यांना हा मोलाचा सल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कृषिप्रधान भारत देशात शेती हा उत्पादनाचा प्रामुख्याने मानला जाणारा स्रोत आहे.

देशात असंख्य शेतकरी बांधव आहे. शेती करताना माती परीक्षण व बियाणे परीक्षणावर भर दिल्यास शेतीला उज्वल भवितव्य प्राप्त होईल,

असा विश्वास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केला. भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला जात असला तरी सध्या देशातील शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.

यामुळे शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात युवा शेतकऱ्यांनी शेतीपिकाची उत्पादकता वाढविण्याबरोबर शेतमालाची योग्य बाजारपेठ मिळविण्यावर भर देणे आवश्यक आहे.

असा मौलिक सल्ला आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिला. पारनेर तालुक्यातील जवळा येथे उज्वला अँग्रो फर्टिलायझर या कृषी उद्योगाचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. प्रयोगशील शेती करण्यावर भर दिल्यास व शेतीमालाची योग्य बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतीला चांगले दिवस येतील. मात्र यासाठी युवा शेतकऱ्यांनी माहिती व तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment