Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला….! आज राज्यात ‘या’ ठिकाणी अतिवृष्टी होणार, वाचा डख यांचा नवीन मान्सून अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaz: शेतकरी बांधव (Farmers) मोठ्या आतुरतेने पंजाबराव डख साहेबांच्या (Panjabrao Dakh) मान्सून अंदाजाची वाट पाहत असतात. आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवणारे पंजाबराव डख साहेबांनी (Panjabrao Dakh News) आजचा सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला आहे.

खरं पाहता भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सूनने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापले आहे. मात्र असे असले तरी मान्सूनच्या (Monsoon News) पावसासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने मान्सूनच्या (Monsoon) पावसाने (Rain) अजूनही अपेक्षित अशी हजेरी राज्यात लावलेली नाही. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार अशी भविष्यवाणी केली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते 18 जून पासून राज्यात मान्सून साठी पोषक वातावरण तयार होत असून 19 जून ते 21 जून या कालावधीत राज्यातील अनेक भागात मुसळधार मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. यामुळे निश्चितच पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळत आहे. आता पंजाबराव डक साहेबांनी देखील आपला सुधारित अंदाज जारी केला आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाबराव डख साहेबांचा आजचा मान्सून अंदाज (Panjab Dakh Weather Report).

परभणीचे भूमिपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 18 जून ते 20 जून या कालावधीत मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. एवढेच नाही मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात या कालावधीत अतिवृष्टी देखील होऊ शकते असा पंजाबराव यांचा अंदाज आहे.

दरम्यान पंजाबराव यांच्या मते 22 जून पर्यंत राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे देखील आटपून जाणार आहेत. म्हणजे 22 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. निश्चितच पंजाबरावांच्या या अंदाजामुळे पेरणी साठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत.

डख यांनी मान्सून बाबत अधिक माहिती देताना सांगितले की, यावर्षी राज्यात मान्सूनचं आगमन दक्षिणेकडून म्हणजे सोलापूरमधुन झाले आहे. पंजाबराव डख साहेबांनी मान्सूनच्या अंदाजा समवेतच शेतकरी बांधवांसाठी एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. डक यांच्यामध्ये शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यापूर्वी जमिनीची ओल तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे.

100 मिलिमीटर म्हणजेच पेरणीयोग्य पाऊस झाला तरच शेतकरी बांधवांनी पेरणी करावी अन्यथा पेरणी करू नये असा सल्ला देखील डख यांनी दिला आहे. राज्यातील कृषी विभागाने देखील शेतकरी बांधवांना पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला दिला आहे.

कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी पावसाची चिंता न करता पेरणी साठी आवश्यक ती कामे आटपून घ्यावीतं. तसेच खरीप हंगामात सुधारित बियाणे पेरावे असा सल्ला दिला आहे. पंजाबराव डख यांनीदेखील विद्यापीठाद्वारे जारी करण्यात आलेली बियाणेचं वापरावे असा सल्ला दिला आहे.