उड्डाणपुलामुळे शहरात होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :-नगर शहरातील बहुचर्चित सुमारे साडेतीन किलोमीटरच्या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. या उड्डाणपुलामुळे शहरात होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी खासदार डॉ. विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी केली.

लवकरच उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन, नगरकरांच्या स्वप्नातील उड्डाणपूल वाहतुकीस लवकरच सुरू होणार असल्याचा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले, या उड्डाणपुलामुळे शहरात होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. होणारे अपघातही टळतील हा उड्डाणपूल नगर शहराच्या वैभवात भर पाडेल,

यापुढील काळातही अशाच विकास कामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक सुभाष लोंढे, नगरसेवक मनोज कोतकर, धनंजय जाधव,

नगरसेवक राहुल कांबळे, अजय चितळे, संभाजी पवार, गणेश नन्नवरे, संतोष ढाकणे, संतोष लांडे, वैभव वाघ, वैभव ढाकणे, मळू गडाळकर, ओंकार घोलप, सागर गुंजाळ तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.