Weather Update: सावधान..! ‘या’ जिल्ह्यात 15 ऑगस्ट पावसाच्या छायेत, पावसातच करावं लागणार झेंडावंदन, वाचा हवामान विभागाचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update: राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे (rain) तांडव बघायला मिळत आहे. काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी पावसाची (monsson news) तीव्रता खूपच अधिक आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय शेतकरी बांधवांची डोकेदुखी देखील अति मुसळधार पावसामुळे वाढली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात पावसाची (monsoon) शक्‍यता राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (imd) वर्तवण्यात आला आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपला भारत देश उद्या 75वा स्वातंत्र्य दिवस (independence day) उद्या साजरा करणार आहे. आपल्या राज्यात देखील मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होणार आहे. संपूर्ण राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे या प्रसंगी आयोजन करण्यात आले आहे. मात्र भारतीय हवामान विभागाने वर्तवला सुधारित हवामान अंदाजानुसार (maharashtra weather update) उद्या राज्यात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना पावसाच्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे. यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना उद्या करावा लागण्याची शक्यता आहे.

मित्रांनो भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही भागात दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असला तरीदेखील दक्षिण कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस कायम आहे. उद्या सोमवारी म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देखील राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर विशेषता घाटमाथ्यावर उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, कोकणातील मुंबई, पालघर, ठाणे खानदेश विभागातील जळगाव पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये उद्या हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात बहुतांशी धरणे फुल भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील 18 धरणे शंभर टक्के भरले असून या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. यामुळे नदीकाठी वसलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. निश्चितच भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिना प्रसंगी वरूणराजा भारत मातेचा अभिषेक करण्यासाठी येणार आहे. याप्रसंगी नागरिकांना थोडीशी गैरसोय सोसावी लागणार आहे.