श्रीगोंदा : यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले असले तरी अजूनही मागील गाळप हंगामातील ऊस उत्पादकांचे पैसे साखर कारखान्यांनी दिलेले नाहीत. त्या कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून जप्ती कारवाई करण्यात येत आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या संबंधित असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा (१) खासगी कारखान्याने ऊस उत्पादकांचे देणे थकविलेले असल्याने या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई झालेली आहे. त्यातील पाच कारखान्यांनी ऊस उत्पादकांची सर्व थकित रक्कम दिलेली असून, तीन कारखान्यांकडे ‘एफआरपी’ची थकबाकी आहे.
त्यात पाचपुते यांच्या संबंधित दोन कारखाने आहेत. पाचपुते यांच्या संबंधित देवदैठण येथील साईकृपा खासगी कारखान्यावर ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
याबाबतचा आदेश नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयाला सोमवारी मिळाला आहे. साईकृपा (एक) या कारखान्याकडे ‘एफआरपी’ची ३ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम थकित आहे. या कारवाईनुसार महसूल प्रशासन शिल्लक साखर व बगॅसची विक्रीतून वसुली करून ऊस उत्पादकांना देणार आहे.
- Fixed Deposit : फक्त 7 ते 12 महिन्यांच्या एफडीवर ‘या’ बँका गुंतवणूकदारांना करत आहेत मालामाल, बघा यादी!
- Toyota Car: टोयोटाने भारतात लॉन्च केली परवडणाऱ्या दरातील ‘ही’ 7 सीटर कार! मोठ्या कुटुंबासाठी राहील फायद्याची, वाचा वैशिष्ट्ये
- Ahmednagar Politics : शिर्डीत ट्विस्ट ! अहमदनगरच्या दिग्गज नेत्याची मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकींनंतर मंत्री भुसेंसोबत २ तास चर्चा, प्रचारात होणार सक्रिय, गणिते बदलणार
- Maruti Suzuki : मारुतीच्या ‘या’ कारचा मार्केटमध्ये धमाका! विक्रीने गाठला नवा उच्चांक
- Tax Saving Tips: तुम्ही देखील नोकरदार आहात आणि तुम्हाला टॅक्स वाचायचा आहे का? ‘या’ पर्यायांचा वापर करा आणि 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्स वाचवा