नवी दिल्ली : २०१७ मध्ये देशभरात ८१२९ लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. यात १४८८ लोक महाराष्ट्रातील, तर ९६८ लोक हे मध्यप्रदेशातील होते, अशी माहिती मिळते. यावरून देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लोक आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. यानंतर मध्यप्रदेशचा नंबर लागतो, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी)च्या २०१७ च्या रिपोर्टमधून पुढे आली आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी)च्या २०१७ च्या रिपोर्टमध्ये मध्यप्रदेशात ७०७ महिलांनी आत्महत्या केली आहे, तर पुरुषांची संख्या २६२ इतकी आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात ९५१ महिलांनी आत्महत्या केली आहे, तर पुरुषांची संख्या ५३७ आहे. २०१६ मध्ये देखील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातच जास्त आत्महत्या केल्या होत्या. यात महाराष्ट्रातील ७६८ आणि मध्यप्रदेशातील ५६५ महिलांनी स्वत:चे जीवन संपवून घेतले होते.
वर्ष २०१७ मध्यप्रदेशातील ५९ लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केले; परंतु समजूत काढून त्यांचे जीव वाचवले होते. एनसीआरबीनुसार, मध्यप्रदेशात असफल आत्महत्येचा दर १.२ टक्के आहे आणि देशात तिसऱ्या स्थानावर आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे
- Naval Dockyard : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; मुंबईत निघाली भरती…
- बजाज ‘या’ तारखेला लाँच करणार जगातील पहिली CNG बाईक ! येत्या एका वर्षात तब्बल ‘इतक्या’ सीएनजी बाईक्स बाजारात येणार, काय म्हणतात राजीव बजाज ?
- Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 250 रुपये गुंतवा अन् 24 लाख मिळवा, अशा प्रकारे करा गुंतवणूक…
- Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत आजच उघडा खाते, दरमहा मिळतील 9200 रुपये…
- Tata Motors : मे महिन्यात लाँच होणार ‘या’ कार्स, बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, बघा किंमत…