“उद्धवसाहेबांना आता शरद पवार जवळचे झालेत अन् आम्ही दूरचे”

मुंबई : शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडल्याने अवघ्या महाराष्ट्रात या विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर गटाने मुंबईत पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बोलताना एक खंत बोलून दाखवली आहे. ‘कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. … Read more

धनुष्यबाण नेमका कोणाचा? सेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धुनष्यबाण यावरुन आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर आपला हक्क बजावला जात आहे.शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाण्याची चिन्ह दिसत असतानाच आता शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक याचिका दाखल केले आहे. शिवसेनेने केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ … Read more

“न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता काही अर्थ नाही”

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आता एकनाथ शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वांनाच आता दिलासा दिला आहे. न्यायालयाची भूमिका योग्य आहे. शिवसेनेने … Read more

आधी ठाकरेंकडे या म्हणत रडणारे संतोष बांगर आता उद्धव ठाकरेंनाच म्हणाले, ‘दृष्टीकोन बदला’

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संजय बांगर आक्रमक झाले आहेत. बांगर यांच्या समर्थनार्थ मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली होती. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी प्रसारमाध्यमांमध्ये मला पदावरुन हटवण्यात आल्याचे वृत्त … Read more

शिवसेनेचे निवडणूक चिन्हाबाबत धनुष्यबाणाबाबत अनिल परबांचे मोठे वक्तव्य

मुंबई :  राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यावरुन शिवसेनेतील अंतर्गत वाद आता न्यायालयामध्ये पोहचला आहे. सध्या शिवसेनेत निवडणूक चिन्हाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असताना शिवसेना नेते अ‌ॅड. अनिल परब यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिलेल्या निर्देशानंतर अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे निवडणूक … Read more

सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्णय न घेण्याचे आदेश; शिवसेनेची नाराजी

मुंबई : शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले आहे त्याच्या मुळावर घाव … Read more

औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की … Read more

राजभवनाचा वापर करुन भाजप-शिंदे सरकार लादलं; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. राज्यात भाजपसोबत हातमिळवणी करत शिदे गटाने सरकार स्थापन केले. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत … Read more

बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे … Read more

तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी … Read more

ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडला तेव्हा महिला रडत होत्या, त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील- संजय राऊत

नाशिक : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. अनेक विषयांवरुन सेनेमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. बंडखोरांनी रोखठोक भाष्य करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. संजय राऊत आज नाशिकमध्ये सभेसाठी गेले असून सभेमध्ये बोलताना बंडखोर आमदारांवर राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं … Read more

“शिवसेना आमच्याच बापाची, बंडखोरांना ५० खोके पचणार नाहीत”

नाशिक : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील वाद शिगेला पोहचला आहे. बंडखोरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संबंधित बंडखोर आमदार अद्याप आम्ही शिवसेनेत आहोत, असा दावा करत असले तरी शिवसेनत फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. ४० आमदार एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य … Read more

ठाकरे-शिंदेंनी एकत्र यावं, हीच आमची भूमिका; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. सध्या शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन वाद तु तु मै मै सुरु आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. त्यावरुन आता शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी वक्तव्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

ज्यांचं रक्त भगवं तो ठाकरेंसोबत; आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंड केला आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी निष्ठा यात्रेला सुरवात केली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला भेट देत आहेत. विरोधकांकडून बाकीचे आमदार देखील शिवसेनेला रामराम करतील असा दावा केला जात आहे. असा दावा करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी चांगलंच सुनावलं … Read more

ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत; राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच राणेंची टीका

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांना अटक वॉरंट जारी केल्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.   संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटक होणार. संजय राऊत … Read more

आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग…; राऊतांचं ४० बंडखोरांना आव्हान

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली आणि सरकार स्थापन केले. तत्पुर्वी शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केला. त्यावरुन शिवसेनेमध्ये मोठा वाद झाला. राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ झाली. आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोरांना चांगलच धारेवर धरलं. त्याला संजय राऊतांनी टोला लगावला आहे. शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचे अस्तित्वच … Read more

धनुष्यबाण आम्हालाच मिळणार; शंभूराजे देसाईंचा विश्वास

मुंबई : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावरुन मोठा वादंग सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना धनुष्याबाण असो अथवा इतर कोणतेही चिन्ह मिळाले तरी कंबर कसून हे चिन्ह घराघरात पोहचवण्याची तयारी ठेवा, असे आवाहन उद्धव … Read more

मी कधीच कोणासमोर लोटांगण घातलं नाही; भुमरेंचं राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोर आमदारांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. बंडखोरांनी राऊतांवर केलेल्या टीका आणि आरोपांना संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेत उत्तरे दिली. ‘संदीपान भुमरे हे मंत्री झाले तेव्हा सामना कार्यलयामध्ये आले आणि माझ्यासमोर लोटांगण घातलं’, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या वक्तव्यावर संदीपान भुमरे यांनी आता भाष्य केले आहे. मी … Read more