कोरोनाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मार्च महिण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

याला काही अंशी नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे.

महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, आपली व कुटुंबाची काळजी घेणे, मात्र लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला.

त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे. असे हजारे म्हणाले. दरम्यान राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरदिवशी अनेकांचे प्राण जात आहे, ही दुर्दैवाची बाब आहे.

सरकारने तातडीने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. जनता बेजबाबदारपणे वागते, याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

असे असले तरी सुद्धा याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. सरकारने रूग्ण संख्या वाढत आहे, यासाठी वाढीव रूग्णालये उभारणे गरजेचे आहे. कोणत्याही स्थितीत कोरोना रूग्णास मृत्यू येऊ नये.

यासाठी सरकारी यंत्रणेने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनावर लवकर लस येईल, असे चिन्ह सध्या तरी दिसत नाही. कोरोना रूग्णांना पैसे देऊनही उपचाराअभावी मृत्यू येत असेत, तर तो योग्य नाही. असेही हजारे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment