नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर देशात सुपर इमर्जन्सीसारखी स्थिती लादल्याचा आरोप केला आहे.
त्यावर भाजपने पलटवार करताना म्हटले की, सुपर इमर्जन्सी तर पश्चिम बंगालमध्ये आहे. तेथे ‘जय श्रीराम’ ही घोषणा दिल्यानंतर तुरुंगात डांबले जाते. दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील बलिया येथील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना धमकीच दिली.
सिंह म्हणाले की, ममतांनी आपली भाषा बदलावी, अन्यथा त्यांची स्थितीही काँग्रेसचे नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासारखीच होईल. आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले की, ‘ममता बॅनर्जी भारतीय आहेत, त्यामुळे त्या येथे राहू शकतात.
पण त्यांनी देशविरोधी भाषा केली तर त्यांना पी. चिदंबरम यांच्यासारखाच धडा शिकवला जाऊ शकतो.’ आपल्या विधानसभा मतदारसंघातील बैरिया येथे शनिवारी दोन दिवसांच्या कृषी मेळ्याचे उद्घाटन केल्यानंतर सिंह म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना बांगलादेशी घुसखोरांना वाचवून राजकारण करायचे असेल तर त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान व्हावे. ममता यांना विदेशी शक्तींचा पाठिंबा मिळत आहे असे वाटते.
- Vani Merchant Bank Bharti : नाशिक मधील वाणी मर्चंट बँकेत ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज!
- Command Hospital Pune Bharti : पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये होणार ‘या’ पदांसाठी भरती, मुलाखतीचे आयोजन!
- गुगलने आज एका भारतीय महिलेचे बनवलंय डूडल ! जाणून घ्या कोण होत्या या हमीदा बानो
- Fixed Deposit : 5 बँका 3 वर्षांच्या FD वर देतायेत बंपर व्याज, आजच करा गुंतवणूक!
- Top 4 Affordable cars : होंडाच्या ‘या’ कार्सवर कपंनी देत आहे 1 लाख रुपयांपर्यंत सूट, आजच आणा घरी!