गावोगावी जाऊन संघर्ष करा..सरकारचा बुरखा टराटरा फाडा.. ; ओबीसी आरक्षणावरून चंद्रकांतदादांचा घणाघात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरून भाजपने (Bjp) ठाकरे सरकार व महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल चढवला आहे.

नुकतेच मुंबईत (Mumbai) भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या एका बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पुन्हा घाव घातला आहे.

चंद्रकांतदादा म्हणाले, कोर्टाने लवकरात लवकर ट्रिपल टेस्ट करण्यास या सरकारला सांगितलं. पण या सरकारने कानाडोळा केला. ठरवून मराठा समाजाचे आरक्षण (maratha reservation) टिकवण्याचा प्रयत्न यांनी केला नाही.

ओबीसींच्या आरक्षणाचंही तेच केलं. यांना सगळं कळत तरी सुद्धा यांना करायच नाही. पोटात दुखणं तसा हा प्रकार आहे. ओबीसी राजकीय आरक्षण नसेल तर मग माहापौर, पंचायत, नगरपालिकांमध्ये प्रतिनिधित्व कसे मिळेल? असा सवाल करतानाच आता या सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे.

त्यासाठी आपल्याला संघर्ष करावाच लागेल. पाच वर्ष आरक्षण नसेल, त्यामुळे आपण शांत बसणार नाही. आपल्याला गावोगावी जाऊन संघर्ष करावा लागणार आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

तसेच वार्डामध्ये जरी आरक्षण नसले तरी आम्ही ओबीसी पुरुष आणि महिलांना २७ टक्के राजकीय आरक्षण देणार आहोत. मात्र, आरक्षण घालवणाऱ्या या सरकारला घेराव घाला.

त्यांना जीआर दाखवा की प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल देणार होता त्याचं काय झालं? आरक्षणाची लढाई ही सोयीसुविधांची लढाई आहे. सरकारने दिलेल्या सुविधा समाजाला मिळवून द्यायच्या आहेत, असेही चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले आहेत.