श्रीगोंदा : यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले असले तरी अजूनही मागील गाळप हंगामातील ऊस उत्पादकांचे पैसे साखर कारखान्यांनी दिलेले नाहीत. त्या कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून जप्ती कारवाई करण्यात येत आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या संबंधित असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा (१) खासगी कारखान्याने ऊस उत्पादकांचे देणे थकविलेले असल्याने या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई झालेली आहे. त्यातील पाच कारखान्यांनी ऊस उत्पादकांची सर्व थकित रक्कम दिलेली असून, तीन कारखान्यांकडे ‘एफआरपी’ची थकबाकी आहे.
त्यात पाचपुते यांच्या संबंधित दोन कारखाने आहेत. पाचपुते यांच्या संबंधित देवदैठण येथील साईकृपा खासगी कारखान्यावर ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
याबाबतचा आदेश नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयाला सोमवारी मिळाला आहे. साईकृपा (एक) या कारखान्याकडे ‘एफआरपी’ची ३ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम थकित आहे. या कारवाईनुसार महसूल प्रशासन शिल्लक साखर व बगॅसची विक्रीतून वसुली करून ऊस उत्पादकांना देणार आहे.
- कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! Mahindra XUV 3XO लाँच झाली, मायलेज अन सेफ्टी फीचर्स आहेत दमदार, किंमत किती ?
- DY Patil Vidyapeeth Pune : पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात नोकरी करण्याची उत्तम संधी, वाचा सविस्तर…
- मुंबई SNDT यूनिवर्सिटीत ‘शिक्षक’ पदांच्या जागेसाठी निघाली भरती; अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!
- तुमची कुंडली काढायला लावू नका ! केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा केडगांवकरांच्या मी पाठीशी, लंके यांची ग्वाही
- Safest Cars : सुरक्षित कार खरेदी करायचीय?, मग बघा भारतातले स्वस्त 5-स्टार सुरक्षा रेटिंग असलेले बेस्ट पर्याय, फीचर्सही भन्नाट!