नगर :- राजकारण स्वत:साठी नव्हे तर जनतेच्या विकास व कल्याणासाठी केले जाते. केडगाव उपनगर विकासापासून वंचित होते.
येथील जनतेला सुख-सुविधा निर्माण करुन देणे हे पहिल्यापासून शिवसेनेचे स्वप्न होते. केडगावच्या विकासाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
येथील दादागिरी संपुष्टात येऊन, शिवसेनेच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली आहे.
तर सर्वसामान्य नागरिक भयमुक्तीने वावरत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केले.
केडगाव मधील एकनाथनगर परिसरात स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या माध्यमातून बंद पाईप गटार व ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ करताना राठोड बोलत होते.
याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, नगरसेविका सुनिता कोतकर, शांताबाई शिंदे,
प्रतिभा दारकुंडे, अलका दारकुंडे, मीना येणारे, रत्ना सरोदे, सुनिता कोहक, रेशमा पठाण, लक्ष्मी परबंडोळे आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राठोड म्हणाले, नागरिकांनी आपले प्रश्न नि:संकोचपणे आपल्या नगरसेवकाला सांगितले पाहिजेत. अर्ध्या रात्री देखील नागरिकांच्या कामासाठी मी हजर राहत असतो.
केडगावची परिस्थिती बदलत असून, सर्वसामान्य जनतेचा विकास केंद्रबिंदू मानून शिवसेनेचे नगरसेवक आपले कार्य करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
- Ahmednagar Politics : पावणे पाच वर्ष सत्ताधारी आमदार असताना दूध, कांदा प्रश्नावर आवाज का नाही उठवला? खा.सुजय विखेंचा लंके यांच्या वर्मावर घाव
- Mp Sujay Vikhe Patil : मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझा अनुक्रमांक तीन : डॉ. सुजय विखे पाटील
- Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये पुण्यावरून आलेल्या खासगी प्रवासी बसला भीषण आग !
- बीडमध्ये ‘अशी’ आहे जातनिहाय आकडेवारी ! मराठा विरुद्ध ओबीसी वादात पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे तरणार? जातीय आकडेवारीनुसार..
- Pune Bharti 2024 : ग्रेजुएट उमेदवारांना पुण्यातील आर्मी लॉ कॉलेजमध्ये नोकरीची सुर्वण संधी, फक्त करा हे काम!