अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले.
जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.
१९९५ साली शिवसेनेच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते, नंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसकडे
आणि आता भाजपची सत्ता आल्यावर राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडे वळले आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा.डॉ सुजय विखे ज्यावेळी भाजपमध्ये गेले त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते.
चर्चेत राहण्यासाठी फक्त टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी आज त्यांनी राजीनामा दिला आहे, असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान लवकरच विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.
- पोस्टाच्या ‘या’ योजनेत 417 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 40 लाख ! कोणती आहे ही योजना
- बजाज ऑटो 18 जूनला करणार जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च! पेट्रोल बाईकच्या तुलनेत चालेल अर्ध्या किमतीत
- कार घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! होंडा कंपनीच्या ‘या’ 7 लाखाच्या गाडीवर मिळतोय तब्बल 1 लाखाचा डिस्काउंट
- Ahmednagar Breaking : विश्वस्तांच्या खोटया सह्या करत बँकेत कर्ज प्रकरण, नगरच्या डॉक्टरांनी बनावट कागदपत्रांद्वारे केली साडेआठ कोटींची फसवणूक
- पारनेर तालुका शिवसेनेची शनिवारी बैठक जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांची उपस्थिती तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांची माहिती