मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत चार दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस तसेच २४ ऑक्टोबर रोजी एक दिवस अशा एकूण चार दिवसांसाठी मुंबई शहरात सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी असेल त्यामुळे सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली असून आता अर्जांची छाननी सुरु आहे. उद्या ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर एकदा उमेदवारी निश्चित झाली की दोन दिवसांत प्रचाराचे नारळ फुटतील आणि राज्यात प्रचाराला वेग येईल. दरम्यान, राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
- कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! Mahindra XUV 3XO लाँच झाली, मायलेज अन सेफ्टी फीचर्स आहेत दमदार, किंमत किती ?
- DY Patil Vidyapeeth Pune : पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात नोकरी करण्याची उत्तम संधी, वाचा सविस्तर…
- मुंबई SNDT यूनिवर्सिटीत ‘शिक्षक’ पदांच्या जागेसाठी निघाली भरती; अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!
- तुमची कुंडली काढायला लावू नका ! केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा केडगांवकरांच्या मी पाठीशी, लंके यांची ग्वाही
- Safest Cars : सुरक्षित कार खरेदी करायचीय?, मग बघा भारतातले स्वस्त 5-स्टार सुरक्षा रेटिंग असलेले बेस्ट पर्याय, फीचर्सही भन्नाट!