अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले, जनादेश महायुतीला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांनी सत्ता स्थापन करायला हवी होती. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री व कमी जागा असेल त्यांचा उपमुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते, पण हा निर्णय शेवटी वरिष्ठांचा असतो.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
- गुगलने आज एका भारतीय महिलेचे बनवलंय डूडल ! जाणून घ्या कोण होत्या या हमीदा बानो
- Fixed Deposit : 5 बँका 3 वर्षांच्या FD वर देतायेत बंपर व्याज, आजच करा गुंतवणूक!
- Top 4 Affordable cars : होंडाच्या ‘या’ कार्सवर कपंनी देत आहे 1 लाख रुपयांपर्यंत सूट, आजच आणा घरी!
- ही संधी सोडू नका! आयफोनच्या किंमतीत मोठी कपात, याठिकाणी सुरु आहे सेल…
- तुमच्याकडे यंत्रणा, मग रडीचा डाव का खेळता ? अभिषेक कळमकर यांचा सवाल नगरमधील मारहाणीच्या आरोपास प्रत्युत्तर