राहुरी :- तालुक्यात २५ वर्षांत झाली नाही इतकी कामे आपल्या काळात झाली असून आपण नेहमीच जनतेत असल्याने
यावेळी राहुरीतून एक लाख मते विकास कामांच्या माध्यमातून मिळविणार असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहुरी तालुक्यातील गुहा, वडनेर व तांदुळनेर येथे आ. कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी आ. कर्डिले बोलत होते.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार,
के. मा. कोळसे, उत्तम कोळसे, गणेगावचे सरपंच अमोल भनगडे, अण्णासाहेब बलमे, गोरक्षनाथ घेर आदी उपस्थित होते.
आ. कर्डिले म्हणाले, राज्यात युतीचे सरकार सत्तेत आल्यापासून राहुरी तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.
भागडा चारी, निळवंडे कालव्यांचा प्रश्न, मदत व पुनर्वसन विभागाचा निधी आदी प्रश्न सुटण्यास मदत झाली असून
ग्रामविकास विभागामार्फत अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मोठा निधी प्राप्त झाला आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळाल्याने राज्यात अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी आमदारकी पणाला लावली, असेही त्यांनी सांगितले.
भाजप तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, अमोल भनगडे आदींची भाषणे झाली. आ. कर्डिले यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
- Tata Motors : मे महिन्यात लाँच होणार ‘या’ कार्स, बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, बघा किंमत…
- महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीच्या सत्तेची गरज – डॉ. सुजय विखे पाटील
- Amazon Great Summer Sale : iPhone 13, सॅमसंग अन् OnePlus च्या फोन्सवर मिळत आहे 10 हजारांपेक्षा जास्त सूट…
- Top 10 Shares : एका आठवड्यात ‘या’ शेअर्सनी दिलाय जबरदस्त परतावा, जाणून घ्या 10 शेअर्सची नावे
- Plastic Bottle Side Effects : प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पित असाल तर आजच व्हा सावध! ‘या’ गंभीर समस्यांना पडू शकता बळी…