मुंबई :- सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याचं समजतं आहे.
मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यास राष्ट्रवादी असमर्थ असल्याचा निष्कर्ष काढत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यावर अखेर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.
आज सकाळपासूनच आजच राष्ट्रपती लागू होईल अशी चर्चा सुरु होती. राज्यपाल आज रात्री 8.30 पर्यंत वाट पाहतील. जर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यास राष्ट्रपती राजवटीची शिफारस होऊ शकते, असं म्हटलं जात होतं.
परंतु राज्यपालांनी दुपारी दीडच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्यांचं पत्रे आहेत की नाही याबाबत विचारणा केली. मात्र आमच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचं राष्ट्रवादीने राज्यपालांना कळवलं.
त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीसंदर्भातील अहवाल राष्ट्रपतींना पाठवलं. आणि त्यानंतर आता राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
काँग्रेसला आमंत्रण न देणं हा निर्णय पक्षपातीपणाचं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. एकट्या राष्ट्रवादीला आमंत्रण देणं चुकीचं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून आमंत्रण द्यायला हवं होतं. काँग्रेसला आमंत्रण न देणं हा निर्णय पक्षपातीपणाचं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
- Ahmednagar Politics : विखे की लंके ! थेट राजस्थानातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सट्टा मार्केटचेही लक्ष? शिर्डीत मात्र शांतशांत
- Ahmednagar Politics : अजितदादांनी अहमदनगरच्या राजकारणात ‘डाव’ टाकला ! रोहित पवारांना मोठा धक्का, राजकीय गणिते फिरण्याची शक्यता
- Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेची ग्राहकांना मोठी भेट, गुंतवणूदारांना होणार पूर्वीपेक्षा जास्त फायदा!
- Maruti Suzuki : देशातील लोकप्रिय अन् स्वस्त कारवर मिळत आहे मोठा डिस्काउंट, आजचा करा बुक…
- Samsung Galaxy : अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर फोन घेण्याचा विचार करताय?, तर मग वाचा ही बातमी!