Onion Farming : कांदा लागवड केली का? मग लागवडीनंतर 30 दिवसांनी द्या हे खत, कांदा चांगला जमणार, उत्पादन वाढणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Farming : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कांदा लागवड (Onion Cultivation) जोरात सुरु आहे. खानदेशात कांदा लागवड (Onion Crop) आता अंतिम टप्प्यात आली आहे. मित्रांनो आपल्या राज्यात कांदा या नगदी पिकाची (Cash Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जात असून देशाच्या एकूण कांदा उत्पादनात (Onion Production) महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून असते. खरं पाहता कांदा पिकावर हवामान बदलाचा मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. कांद्याच्या बाजारभावात (Onion Rate) देखील सातत्याने चढ उतार कायम राहत असल्याने शेतकरी बांधवांना याचा मोठा फटका बसतो.

मात्र, असे असले तरी आपल्या राज्यात कांदा लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. जाणकार लोकांच्या मते कांदा पिकाच्या यशस्वी वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी कांदा पीक व्यवस्थापन (onion crop management) योग्यरीत्या करणे अतिशय आवश्यक आहे. आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कांदा पिका विषयी काही महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो आज आपण कांदा लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी कांदा पिकाला कोणती खते दिली पाहिजेत याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया कांदा लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी कांदा पिकाला द्यावयाची खते.

मित्रांनो, प्रयोगशील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कांदा लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी, 10:26:26- हे खत 60 किलो, तसेच मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो एकत्र करून जमिनीतून कांदा पिकाला दिले पाहिजे. खरं पाहता कांदा लागवडीच्या 30 दिवसानंतर कांदा पीक वाढीच्या अवस्थेत असते अशा परिस्थितीत या अवस्थेत या खताचा वापर केल्यास स्फुरद या कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्‍यक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या खतांचा या अवस्थेत वापर केल्यास कांदा पिकाच्या मुळांचा विकास जलद गतीने होण्यास मदत होते. शिवाय या अवस्थेत या खताचा वापर केल्यास कांदा पिकामध्ये अन्नद्रव्यांचे पोषण क्षमता सुधारते. एवढेच नाही जाणकार लोक सांगतात की लागवडीच्या 30 दिवसानंतर या खताचा वापर केला तर सारख्या आकाराचे कांद्याचे उत्पादन मिळण्यास मदत होते.

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी या खताचा शेतकरी बांधवांनी उपयोग केल्यास त्यांना कांदा उत्पादनात 12 टक्क्यांपर्यंत वाढ मिळू शकते. निश्चितच या खतांचा वापर केल्यास शेतकरी बांधवांना उत्पादनात वाढ मिळणार आहे. मात्र असे असले तरीही कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कोणत्याही खताचा कोणत्याही अवस्थेत वापर करण्याअगोदर एकदा तरी जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.