शिंदे-ठाकरे एकत्र यावे म्हणून दीपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त आज शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी अग्रदूत बंगल्यावर गेल्या आहेत. यावेळी त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच शिंदे साहेबांना भेटणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेही जाणार आहेत. मग … Read more

दीपक केसरकर उडते पक्षी; किशोरी पेडणेकर आक्रमक

मुंबई : आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आल्या होत्या. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर पेडणेकरांनी चांगलीच आगपाखड केली आहे. दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड … Read more

बंडखोरांना जागा दाखवण्याची भाषा करणाऱ्याच शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या आणि मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रेंच्या निर्णयाने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील निवासस्थानी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली आहे. शिंदे गटाच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणं … Read more

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही- दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही … Read more

नारायण राणेंना शिवसेना सोडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली; सेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेत फूट पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली आहे, असा दावा दीपक केसरकरांनी … Read more

बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं; राऊतांची शिंदे गटावर टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटो शेअर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचे सांगत आहेत … Read more

‘विझणार कधीच अंगार नाही’ म्हणत मुख्यमंत्र्यांचे गुरूपौर्णिमेला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात सत्तांतर झाल्याने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका केली जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे … Read more

“नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणारच”

मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर नवे सरकार काय घोषणा करणार किंवा शेतकऱ्यांशी संबंधित काय घोषणा असतील याबाबत सर्व सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाले होते. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार … Read more

…म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटलो; जितेंद्र आव्हाडांनी केला भेटीचा खुलासा

मुंबई :  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये अद्यापही शिवसेनेचे आमदार, खासदार संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणामध्ये अनेक चर्चांना उधाण … Read more

जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई :  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार, खासदार अजूनही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण … Read more

धनुष्यबाण नेमका कोणाचा? सेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धुनष्यबाण यावरुन आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर आपला हक्क बजावला जात आहे.शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाण्याची चिन्ह दिसत असतानाच आता शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक याचिका दाखल केले आहे. शिवसेनेने केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ … Read more

राजभवनाचा वापर करुन भाजप-शिंदे सरकार लादलं; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. राज्यात भाजपसोबत हातमिळवणी करत शिदे गटाने सरकार स्थापन केले. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत … Read more

बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे … Read more

तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी … Read more

ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडला तेव्हा महिला रडत होत्या, त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील- संजय राऊत

नाशिक : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. अनेक विषयांवरुन सेनेमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. बंडखोरांनी रोखठोक भाष्य करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. संजय राऊत आज नाशिकमध्ये सभेसाठी गेले असून सभेमध्ये बोलताना बंडखोर आमदारांवर राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं … Read more

“शिवसेना आमच्याच बापाची, बंडखोरांना ५० खोके पचणार नाहीत”

नाशिक : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील वाद शिगेला पोहचला आहे. बंडखोरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संबंधित बंडखोर आमदार अद्याप आम्ही शिवसेनेत आहोत, असा दावा करत असले तरी शिवसेनत फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. ४० आमदार एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य … Read more

ठाकरे-शिंदेंनी एकत्र यावं, हीच आमची भूमिका; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. सध्या शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन वाद तु तु मै मै सुरु आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. त्यावरुन आता शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी वक्तव्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

“शिवसेनेचे हायकमांड ‘मातोश्री’वर, दिल्लीत नाही, ते भाजपचे मुख्यमंत्री”

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कोणी म्हणत असेल मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेचं सरकार आहे. तर ते चुकीचे आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईमध्ये आहे. … Read more