अहमदनगरमध्ये ६६ टक्के मतदानाची चर्चा झाली पण १२ लाख लोकांनी फिरवलीये मतदानाकडे पाठ, कुठे किती मतदान झाले नाही, पहा आकडेवारी

vote

Ahmednagar Politics : राज्यात बहुचर्चित राहिलेली अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे या तारखेला मतदान झाले. याच दिवशी शिर्डीतही मतदान झाले. अहमदनगर लोकसभेसाठी विक्रमी ६६.६१ टक्के तर शिर्डीत ६३.०३ टक्के मतदान झाले. मतदान किती झाले याबाबत तर सर्वांनीच चर्चा केली. परंतु मतदान न करणाऱ्यांची संख्याही जास्त होती. ही संख्या नेमकी किती होती याबाबत आकडेवारीतून जाणून घेऊयात … Read more

बारामतीतील गोंधळानंतर निलेश लंके समर्थक सावध, स्ट्रॉग रूमबाहेर ठोकला तंबू, चोवीस तास ठेवतायेत करडी नजर

lanke

लोकसभेचा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. यात अहमदनगर लोकसभेची निवडणूक देखील झाली. दरम्यान बारामतीमध्ये तिसऱ्या टप्प्यात निवडणूक झाली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेथील कॅमेरे काही काळासाठी बंद झाले होते. यावरून आता निलेश लंके समर्थकांनी अहमदनगरमध्ये सावध भूमिका घेतली आहे. मतदानानंतर ईव्हीएम ज्या … Read more

Rahuri Railway Station : राहुरी रेल्वे स्टेशनचे स्वरूप बदलणार!

Rahuri Railway Station

Rahuri Railway Station : राहुरी तालुक्याच्या विकासाचा महत्वाचा घटक असलेले राहुरी रेल्वे स्टेशन विकसित केले जात असून प्रवासी व नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशन कात टाकणार असून त्यामुळे पुढील काळात नक्कीच वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या … Read more

आदिवासी भागामध्ये बोगस डॉक्टरांचे बस्तान ! अघोरी उपचार करून जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोलेच्या आदिवासी भागामध्ये बंगाली डॉक्टरांचे आदिवासी बांधवांवर अघोरी उपचार सुरु आहेत. आदिवासी बांधवांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर वेळीच पायबंध घातला गेला नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आदिवासी भागामध्ये निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला आदिवासी बांधवांचे वस्तीस्थान असून याच आदिवासी बांधवांच्या वस्तीस्थानामध्ये बंगाली डॉक्टरांनी आपले बस्तान बसविले आहे. मुळातच कोणत्याही … Read more

Ahmednagar Breaking : घरात घुसत मुलाने बाउंसर असणाऱ्या तरुणीचा गळा कापला, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : नगर शहरातील गुंडागर्दी, गुन्हेगारी या घटना कमी होताना दिसत नाहीत. टोळीयुद्ध, हाणामारी आदी घटना वारंवार घडत असून आता अगदी खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आदी गोष्टी शहरात घडू लागल्या आहेत. आता नगर शहरातून बोल्हेगाव परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (दि. १५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बाउंसर म्हणून काम करीत … Read more

अहमदनगर कोपरगाव रस्त्यावरील बेकायदा होर्डिंग्ज ! दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची

Ahmednagar News

Ahmednagar News : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जण मृत्युमुखी पडले. तर ७५ जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर नगर- कोपरगाव रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे होर्डिंग्ज सुरक्षित उभारलेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेची आहे. येथेही अशी दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची आहे. मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा व पावसाने होर्डिंग कोसळले. यात … Read more

पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले टाळे

Ahmednagar News

Ahmednagar News : पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी कोहंडी येथे लहान मुलांसह संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला काल गुरूवारी (दि.१६) टाळे ठोकले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई भांगरे यांना हे समजताच त्यांनी तत्काळ गावात येत गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांच्या कानावर महिला, ग्रामस्थांच्या भावना टाकल्या. ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची वणवण असून नागरिकांना विहिरीतील खराब पाणी … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंके यांना नाही मिळणार आमदारकीची पेन्शन, केली ‘ही’ चूक

lanke

Ahmednagar Politics : जवळपास वर्षभरापासून अहमदनगरचे राजकारण माजी आ. निलेश लंके यांच्या अवतीभोवती खेळत आहे. निलेश लंके यांनी मागील विधानसभेला पारनेर मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला व ते आमदार झाले. यंदाच्या २०२४ च्या लोकसभेला ते शरद पवार गटाकडून निवडणुकीस उभे राहिले. भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांच्याशी त्यांचा सामना झाला. येत्या ४ जून ला … Read more

10 वी,12 वीनंतर डिग्री, डिप्लोम्याला ॲडमिशन घ्यायचे असेल तर ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार! तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केली लिस्ट

documents list

आता येणाऱ्या काही दिवसात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील व लागलीच शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विविध अभ्यासक्रमांच्या ऍडमिशन करिता पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू होईल. दहावी व बारावीच्या निकालानंतर अनेक जण विविध प्रकारचे डिप्लोमा अर्थात पदविका आणि डिग्री म्हणजेच पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असतात परंतु आता दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर … Read more

Black Wheat | अकोले तालुक्यातील शेतकऱ्याने पिकवला काळा गहू ! किलोमागे ७० रुपये भाव…

Black Wheat

Black Wheat : लाल गहू सगळ्यांना माहित आहे; पण काळा गह म्हटलं तर सर्वांनाच नवल वाटेल. शेतीत नेहमीच वेगळा प्रयोग करणारे अकोले तालुक्यातील टाकळी येथील प्रसन्ना धोंगडे या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न घेत नवीन प्रयोग केला आहे. भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. तसेच पारंपरिक पिकांना बगल देत पीक … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंके यांच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय

nilesh lanke

Ahmednagar Politics : माजी आ. निलेश लंके हे राष्ट्रवादीमधील बंड झाल्यानंतर अजित पवार गटात गेले व तेव्हापासूनच अनेक राजकीय गोष्टी त्यांच्या भोवती फिरत राहिल्या. त्यानंतर अजित दादा गटात असूनही शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी नेहमीच त्यांची सलगी राहिली. ऐन लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवार गटात निलेश लंके दाखल झाले. त्यांनी पारनेरमध्ये याची घोषणा केली व आपला … Read more

नेवासा तालुक्यातील पाईपलाईन फोडल्याने चार दिवसांपासून पाणीबाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीजवळील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. त्यामुळे गावाला चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणीपुरवठा होण्यास ग्रामपंचायतकडून विलंब होत आहे. एकाच महिन्यात जवळपास तीन वेळाही पाईपलाईन फोडण्याचा खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे नागरीकांतुन संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी याच ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील शंभर फूट इलेक्ट्रिक केबल कापून चोरून नेली … Read more

शेणखताला आला सोन्याचा भाव ! शेणखताच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी लागतात इतके पैसे…

 Agricultural News

 Agricultural News : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पावसाच्या आधी सर्व मशागती पूर्ण करण्यात शेतकरी गुंतला आहे. बरेच शेतकरी पावसाच्या आधी शेतात शेणखत टाकत असतात. त्यामुळे आता शेणखतालाही सोन्याचा भाव आला आहे. शेणखताच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी सुमारे चार ते साडेचार हजार रुपये मोजावे लागत आहेत. शेणखताच्या वापरामुळे पिकांची चांगली वाढ होते. मातीतील अन्नद्रव्यांचे … Read more

माऊंट एव्हरेस्टच्या आवाजाचे रहस्य सापडले ! भयानक आवाज ऐकू येतात कारण…

Marathi News

Marathi News : माऊंट एव्हरेस्टने आपल्या भव्यतेने आणि मोहाने गिर्यारोहकांच्याच नव्हे, तर शास्त्रज्ञ आणि साहसी लोकांना पिढ्यान् पिढ्या भुरळ घातली आहे. तरीही त्यातील बरीच रहस्ये अजूनही गुपितच आहेत. यातले महत्त्वाचे रहस्य शोधण्यात संशोधक यशस्वी झाले आहेत. रात्र झाल्यानंतर एव्हरेस्ट पर्वताच्या शिखराच्या सभोवतालच्या हिमनद्यांमधून भयानक आवाज ऐकू येतात. याचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. २०१८ … Read more

मोठी बातमी ! पृथ्वीपेक्षा नऊ पट मोठी महा-पृथ्वी सापडली,१८ तासांचा एक दिवस

Marathi News

Marathi News : सूर्यमालेच्या बाहेर पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधणे हे अंतराळ शास्त्रज्ञांसाठी नेहमीच महत्त्वाकांक्षी मिशन राहिले आहे. याच मोहिमेंतर्गत अनेक वर्षांपासून, अंतराळ शास्त्रज्ञ पृथ्वीसारख्या खडकांनी भरलेला एक बाह्य ग्रह शोधत आहेत, ज्याचे स्वतःचे वातावरण आहे आणि तेथे जीवसृष्टी वाढण्यास अनुकूल परिस्थिती आहे. खगोलशास्त्रज्ञांना अखेर अशा ग्रहाचा शोध लागला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, त्यांनी पृथ्वीपेक्षा … Read more

कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनची सुरक्षितता वादात ! ३० टक्के लोकांना श्वसनमार्गाचा संसर्ग, त्वचा विकाराचा त्रास

Health News

Health News : परदेशात विकसित कोविशील्डपाठोपाठ आता कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनची सुरक्षितता वादात अडकली आहे. कोव्हॅक्सिन घेणाऱ्या ३० टक्के लोकांवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या लोकांमध्ये श्वसनाशी संबंधित संसर्ग, रक्ताच्या गुठळ्या होणे आणि त्वचेशी संबंधित विकार आढळले आहेत. प्रामुख्याने युवा वर्ग आणि एखादी अॅलर्जी असलेल्या लोकांवर दुष्परिणाम अधिक आढळले. बनारस हिंदू विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात … Read more

मानखुर्द-वाशी पुलाचे काम लवकरच होणार पूर्ण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

Maharashtra News

Maharashtra News : ठाणे खाडी पूल प्रकल्पाचाच भाग असणाऱ्या मानखुर्द ते वाशीदरम्यानच्या तीन लेन पुलाचे काम जूनपर्यंत तर उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. या पुलामुळे सध्याच्या मानखुर्द आणि वाशी प्रवासाला बळकटी मिळणार आहे. या पुलाचे काम ७३ टक्के पूर्ण झाल्याचेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या … Read more

मुंबईकर इकडे लक्ष द्या ! आजपासून मध्य रेल्वेवर पंधरा दिवस ब्लॉक

Maharashtra News

Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेतर्फे शुक्रवार, १७ मे ते शनिवार १ जूनदरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, तर आजपासून पुढचे १५ दिवस रात्री १२ वाजून … Read more